एक अतिश्रीमंत माणूस असतो. त्याने त्याच्या घरी रात्र पाळीसाठी एक वॉचमन ठेवलेला असतो. एकदा त्या अतिश्रीमंत माणसाला कामासाठी परदेशी जायचे असते. त्याने तेवढ्यासाठी विमानाचे तिकीटदेखील काढलेले असते. ज्यादिवशी तो श्रीमंत माणूस प्रवासासाठी निघणार असतो त्यादिवशी सकाळी त्याचा तो वॉचमन येतो आणि त्या माणसाला म्हणतो की तुम्ही आज जाऊ नका. तो माणूस विचारतो की का नको जाऊ. तर हा वॉचमन म्हणतो “मी कालरात्री स्वप्न बघितलं की तुम्ही ज्या विमानाने जाणार आहात त्या विमानाला अपघात होतो आणि सर्वच्या सर्व यात्री मरतात.” हे ऐकून तो श्रीमंत माणूस जायचा बेत रद्द करतो. दुसऱ्या दिवशी त्याला पेपर मध्ये वाचून कळतं की खरच त्या विमानाला अपघात झालेला असतो आणि सर्व प्रवासी मेलेले असतात. तो श्रीमंत माणूस हे ऐकून त्या वॉचमनला बोलावतो, त्याला ५०००/- रुपये बक्षीस देतो आणि कामावरून काढून टाकतो. श्रीमंत माणूस असं का करतो?
No comments:
Post a Comment