मा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.
Wednesday 1 March 2017
अनुक्रमणिका
संपादकीय मंडळ
· अमृत बंग
· प्रफुल्ल शशिकांत
· प्रणाली सिसोदिया
· शैलेश जाधव
संपर्क
प्रफुल्ल ९४२०६५०४८४
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश ९५०३०६०६९८
इमेल
contact.knirman@gmail.com
अंक दुसरा | मार्च २०१७
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)
संवादकीय
हॅल्लो मित्रांनो!!!
कसे आहात? मजेत ना? आम्हीही मजेत आहोत.
मित्रांनो तुम्ही बघितलं असेल या वेळेस आपण या सदराला ‘संपादकीय’ न म्हणता ‘संवादकीय’
म्हटलं आहे. कारण भरारी हे कुमार निर्माणच्या
विविध गटांमधील संवादाचं माध्यम आहे. त्याचसोबत आमचा आणि तुमचा देखील संवाद या माध्यमातून
होत असतो. असं हे संवाद साधण्यासाठी ‘संवादकीय’!
आम्हाला खात्री आहे की आपल्या
बैठका नियमितपणे चालू असतीलच, तुमच्या परीक्षा देखील जवळ आल्या असतील, तुम्ही मन लावून अभ्यासही करत असाल. कुमार निर्माणच्या बैठकीला येऊन तुम्ही अभ्यास देखील
करू शकता, कुमार निर्माण ही एक शैक्षणिक
प्रक्रिया आहे. त्यामुळे अभ्यासाचं काही आपल्याला वावडं नाहीये. आपण कुमार
निर्माणच्या बैठकीत अजून काय-काय करू शकतो यावर आपण मागील अंकात आणि प्रत्यक्ष
भेटीतही चर्चा केली आहे.
कुमार निर्माणच्या तुमच्या
यावर्षीच्या गटात काही नवीन मित्र मैत्रिणी देखील सहभागी झाले असतील. त्यांना
कुमार निर्माण म्हणजे काय ? कुमार निर्माण मध्ये आपण काय करतो हे समजावून सांगायची आणि
त्यांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी मागच्या वर्षी गटात असणाऱ्या
विद्यार्थ्यांची देखील आहे.
तुम्ही सगळे यावर्षी उत्साहाने
कृतिकार्यक्रम करता आहात हे बघून खूप आनंद झाला. तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांचे
चांगले फोटो काढून तुम्ही आम्हाला पाठवले देखील आहेत. काही गटांचे असे फोटो आमच्या
पर्यंत पाठवायचे राहिले आहेत तर ते लवकरात लवकर आम्हाला पाठवा. त्यासोबतच तुम्हा
मुला-मुलींना हे कृतिकार्यक्रम कसे सुचले,
बैठकीत त्यावर काय चर्चा झाली, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करताना काय अनुभव आले, हे देखील तुम्ही लिहून
आम्हाला पाठवलं पाहिजे. तुमचे असे अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून
इतरांना व आम्हाला देखील खूप काही शिकायला मिळू शकेल. तर मग उचला पेन आणि लागा
कामाला. तुमच्या अनुभवांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.
गेल्या दोन महिन्यांत तुमच्यापैकी
बहुतांश गटांना आम्ही भेटी दिल्या. तुमच्यासोबत खेळलो, गाणी म्हटली, गप्पा केल्या, आपण सर्वांनी मिळून कुमार निर्माण पुन्हा एकदा समजून
घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली भारी दोस्ती देखील झाली!
आपण ठरवल्याप्रमाणे चर्चेतून
तुम्ही तुमच्या गटाला एक छानसे नावही दिले असेल, गटप्रमुखही नेमले असतील आणि गटाची
एक वहीदेखील बनवली असेल; ज्यात तुम्ही बैठकीचा वृत्तांत आणि अनुभव लिहित असाल. (
ज्या गटांनी अजून हे केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर करावं.)
मित्रांनो, भरारी हे तुम्हा मुलांचं आहे तर
यात तुम्हाला काही बदल हवे असल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच जर तुमच्यापैकी
कोणी छानशी गोष्ट रचत असेल, कोणी गाणे/ कविता करत असेल तर तेही आमच्यापर्यंत पोचवा.
आता परीक्षेनंतर येईल ती म्हणजे
तुम्हा मुलांना मनापासून आवडणारी उन्हाळी सुट्टी! या सुट्ट्यांत कायकाय
करायचं याबद्दलचं तुमचं प्लानिंगही झालं असेल. तुमच्यापैकी काही जण मामाच्या
गावाला जातील, काही फिरायला जातील तर काही
घरीच मित्रांसोबत खेळायची मज्जा घेतील. तुम्ही सर्वजण सुट्ट्यांत खुप मजा करा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी
करा, अवांतर वाचन करा आणि खुप खुप
खेळा!
सुट्ट्या सुरु झाल्या की तुम्ही
असे इकडे-तिकडे जाणार तर काही ठिकाणी कुमार निर्माणचे गट विस्कळीत होतील; तर अशावेळी गटाचे काम बंद
नको पडायला म्हणून तुम्ही काय बरं करू शकता यावर गटात बैठक घेऊन जरूर विचार करा.
गेल्या वर्षी काही गटांनी सुट्ट्यांना जाण्याआधी गटाची बैठक घेतली आणि त्यात
आपापसांत चर्चा करून असे कृतिकार्यक्रम सुचवले जे त्यांना गावाला जाऊनही करता
येतील. अशा काही कृतींची मुलांनी यादीच बनवली होती आणि सगळ्याच मुलांनी त्यानुसार
खुप भन्नाट कृती केल्यादेखील. तुम्ही आपल्या गावी राहणार असाल तर तुम्ही या कृती
आपल्या गटासोबत करू शकता, बाहेर जाणार असाल तर एकेकटे तर करूच शकता पण त्या पेक्षा
जिथे जाणार असाल तिथे नवीन मित्र बनवून त्यांना सोबत घेऊन देखील तुम्ही काही कृती
करू शकतात. सुट्ट्या संपवून परत आल्यावर पुन्हा भेटूच. परत आल्यावर गटांना पुन्हा
पूर्ववत काम चालू ठेवता येईलच.
तर बघा तुम्हालाही असं काही सुचतंय
का !
सुट्ट्यांत खुप
मजा करा...
कुमार निर्माण
मागील अंकात आपण कुमार निर्माण थोडक्यात समजून घेतलं होतं.
आता त्या विषयी थोडी अजून माहिती घेऊया आणि समजून घेऊया.
मग जर आपल्याला स्वतःला सुचलेल्या आणि मनाने केलेल्या कृती
करून एवढा आनंद होत असेल, एवढा अभिमान वाटत असेल
तर आपण अशा काही चांगल्या कृती का करत नाहीत?
त्याचं उत्तर आहे की आपणा सर्वांना दुसऱ्या कुणीतरी
सांगितलेलं काम करायची सवय लागायला लागली आहे. हळूहळू आपल्या स्वतःला काहीही
सुचेनासं व्हायला लागलेलं आहे. आपण विचार करेनासे झालो आहोत. मनाने काही तरी करा, असं जर आपल्याला कुणी सांगितलं तर काय करायचं
याचा आपल्याला प्रश्न पडतो आणि त्या मुळेच आपण स्वतःस सुचलेल्या कृती करून
मिळणाऱ्या अभिमान आणि आनंदापासून दुरावलो आहोत. हा आनंद खरं तर खूप काळ टिकणारा
म्हणजेच शाश्वत असतो.
तर हाच आनंद मिळवण्यासाठी कुमार निर्माणचा आपला एक गट आहे.
असा आनंद मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आता गट का हवा ? एकेकटे काम करायला माणसाला आवडत नाही.
आपल्याला छान काम करायला जर आपले मित्र सोबत असतील तर अजून जास्त मजा येते. म्हणून
हा आपला गट!
यामध्ये आपण तुम्हाला सुचलेल्या छान छान कृती करणार आहोत.
फक्त त्या कृती आपल्या परिसरातील विविध घटकांना मदत करणाऱ्या किंवा परिसराला अजून
छान बनवणाऱ्या असायला हव्या. परिसरातील आपल्याला जाणवणाऱ्या समस्यांवर उपाय
शोधणाऱ्या कृती आपण करायला हव्यात.
उदा.
१. रस्त्यावरील खड्डा बुजवणे
२. नळावरून पाणी न्यायला आजीला मदत करणे
३. भरलेल्या कचराकुंडी बद्दल प्रशासनाला कळवणे
४. पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवणे इ.
चला तर मग अशा तुम्हाला सुचलेल्या छान कृती करूया. काही
लागलं तर आम्ही सोबत आहोतच.
फक्त असे कृतीकार्यक्रम करताना आपण काही काळजी घेऊया. त्या
साठीचे काही नियम ठरवून घेऊया असं म्हणा हवं तर. हे नि
यम तसे तुम्हाला परिचयाचे आहेतच आणि आपल्या वरील चर्चेमध्ये देखील ते आले आहेत. फक्त आपण एकदा त्याची उजळणी करूया.
१. कृतिकार्यक्रम गटातील एखाद्या मुला-मुलीला सुचलेला हवा.
२. गटातील इतर सर्वांना तो मान्य हवा.
३. कृतिकार्यक्रम केल्यावर आणि करताना तुम्हाला आनंद व्हायला हवा.
४. आपल्या कृतीतून कुणालाही त्रास व्हायला नको किंवा परिसराचं नुकसान व्हायला
नको.
एवढी काळजी तुम्ही घेत असालच.
कृती करून झाल्यावर आलेले अनुभव, काय छान झालं, काय चुकलं, काय अजून छान
करता आलं असतं, यावर पुन्हा गटाने मिळून चर्चा करायला हवी त्याला झालेल्या
कृतिकार्यक्रमाच्या अनुभवांचे शेअरिंग असे म्हणूया.
अशाप्रकारे कुमार निर्माण मध्ये चांगला कृतिकार्यक्रम
करताना पुढील पायऱ्या लक्षात ठेवता येतील
१. अनुभव
२. अभ्यास
३. विचार आणि चर्चा
४. कृती
मुलांनो लक्षात ठेवा कुमार निर्माण मध्ये फक्त कृती करणे हे
आपलं ध्येय नाहीये म्हणून फक्त कृतींच्या मागे लागू नका. कृती करताना आपण वर
दिलेल्या पायऱ्यांनुसार ती कृती करतोय का याकडे देखील लक्ष द्या. त्यातून आपल्याला
खूप काही शिकायला मिळेल.
मुलांनो आपण एक गोष्ट नेहमी लक्षात
ठेवूया की कुमार निर्माणचा हा गट तुमच्या ताई दादांचा किंवा तुमच्याशिक्षकांचा
नाहीये; तर हा गट तुम्हा
मुला-मुलींचा आहे. तेव्हा त्यांनी बोलावल्यावर बैठकीला जाऊ, ते सांगतील ती कृती करू असं करून आपल्याला चालणार नाही. गटाच्या
बैठकीची, कृतिकार्यक्रमांची जबाबदारी पूर्णपणे आपली
असणार आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळे मिळून ती जबाबदारी नक्कीच घ्याल
आणि यशस्वीपणे पार पाडाल.
|
मुलांनो आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया की कुमार
निर्माणचा हा गट तुमच्या ताई दादांचा किंवा तुमच्याशिक्षकांचा नाहीये; तर हा गट तुम्हा मुला-मुलींचा आहे. तेव्हा
त्यांनी बोलावल्यावर बैठकीला जाऊ, ते सांगतील ती कृती करू
असं करून आपल्याला चालणार नाही. गटाच्या बैठकीची, कृतिकार्यक्रमांची
जबाबदारी पूर्णपणे आपली असणार आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळे मिळून ती
जबाबदारी नक्कीच घ्याल आणि यशस्वीपणे पार पाडाल.
गोष्ट—खराखुरा न्याय!
तिथे पोहचल्यावर त्या नवीन ग्रहावरील वातावरण बघून मोहन
अगदी भारावून गेला. सगळीकडे तो उत्सुक नजरेने बघत होता. चैतन्य ने मोहनला
स्वतःच्या घरी नेले. तेथे सगळी कामं स्वयंचलित यंत्रमानव करत होते. त्यांनी मोहनला
पाणी आणून दिले. थोडंसं जेवण करून मोहन आणि चैतन्य फिरायला बाहेर पडले. चैतन्य मोहनला
त्याच्या ग्रहाची माहिती सांगत होता. शहरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवत होता.
पहिल्यांदाच भेटल्याने दोघांना देखील खूप आनंद झाला होता. त्या आनंदात भरभरून बोलत
ते रस्त्यांवरून फिरत होते. आपल्याच नादात चालत असताना चुकून मोहनची टक्कर एका
काचेच्या गोलासोबत झाली. मोहन प्रश्नार्थक नजरेने चैतन्य कडे बघू लागला. तेवढ्यात
त्या काचेच्या गोलातून एक माणूस बाहेर आला. त्याच्या कपाळाला टेंगुळ आले होते. मोहन
त्याला काही म्हणायच्या आत तिथे आकाशातून दोन यंत्रमानव आले. हे दोन्ही रोबोट
पोलिसाच्या पोशाखात होते. त्यांनी मोहनला आणि त्या माणसाला पकडलं. त्या माणसाच्या
जखमेला स्कॅन केलं आणि एक कार्ड छापून ते त्या माणसाच्या हातात दिलं. काही
समजायच्या आतच त्या यंत्रमानवांनी दोघानाही उचललं आणि त्यांना घेऊन ते उडाले.
मोहन गोंधळून गेला. त्याला काही त्या रोहितला मारायची इच्छा
नव्हती. त्याची ही अवस्था बघून तो यंत्रमानव पुढे बोलू लागला.
“ही या ग्रहावरील खऱ्या न्यायाची पद्धत आहे. तुझ्यामुळे
रोहितला मार लागला आता तेवढाच मार रोहितने तुला द्यायचा म्हणजे मग न्याय होईल.
म्हणून आम्ही रोहितला त्याच्या कार्डावर त्याला किती मार लागलाय ते लिहून दिलं
होतं आणि त्याला तुला मारायची संधी दिली. पण त्याने त्याला दिलेल्या मर्यादेपेक्षा
जास्त जोराने तुला मारलं. किती जास्त मारलंय ते आम्ही तुला आता लिहून दिलंय
तेवढ्या ताकतीने तू रोहितला मारायचं म्हणजे मग खरा न्याय होईल.”
हे सगळं चालू असताना रोहित बिचारा भीतीने मोहनकडे बघत होता.
त्याच्या डोळ्यात खूप भीती दाटलेली होती.
मोहन विचार करत होता. ‘खरा न्याय’ किती छान ना! कुणालाही जास्त त्रास नाही.
ज्याने जेवढं नुकसान केलंय तेवढंच त्याने स्वतः सुद्धा सोसायचं. खरा न्याय! त्याला
याबद्दल लवकरात लवकर जाऊन चैतन्यसोबत बोलायचं होतं. तो तिथून निघू लागला.
त्या दोन यंत्रमानवांनी त्याला अडवलं.
तो काळ्या कोटातील यंत्रमानव मोहनला म्हणाला; “तू असा नाही जाऊ शकत. तुला त्या कार्डवर
लिहिल्याप्रमाणे रोहितला ठोसा मारावा लागेल तरच खरा न्याय होईल.”
मोहन आणखी गोंधळून गेला. त्याला काही रोहितला मारायची इच्छा नव्हती. रोहितने खरंच मोहनला
जोरदार ठोसा मारला होता पण मोहनचं मन काही रोहितला मारायला तयार नव्हतं.
त्याने काचेच्या भिंतीतून आजूबाजूला बघितलं. त्याला दिसलं
की अशाच असंख्य खोल्यामध्ये काळे कोट घातलेले यंत्रमानव बसलेले आहेत. लोक
एकमेकांना मारतायत, ढकलून देताय. त्यांच्या
हातात मोहनच्या हातात असलेल्या कार्डसारखं कार्ड होतं. सगळीकडे हीच परीस्थिती
त्याला दिसली. त्याला थोडी भीती देखील वाटली.
त्याची अशी अवस्था बघून काळ्या कोटातील यंत्रमानव म्हणाला “तुला घाबरायचं काहीही कारण नाहीये. ही खऱ्या
न्यायाची पद्धतच आहे. दोघानाही अगदी सारखा न्याय मिळेल. तू जर आता रोहितला जास्त
जोराने मारलं तर आम्ही पुन्हा त्याला असं कार्ड देऊ आणि तो तुला मारेल. असं
जोपर्यंत दोघांनाही समान मार मिळत नाही तोपर्यंत चालू राहील.”
मोहन थोडा विचार करून म्हणाला; “ठीक आहे, मी रोहितला
माफ करतो. मला त्याला मारायचं नाहीये.”
“नाही ! ते शक्य नाही.” तो यंत्र मानव म्हणाला. “तुला तुझ्या कार्डावर
मिळालेले गुण वापरावेच लागतील. हीच खऱ्या न्यायाची प्रक्रिया आहे.”
काय त्रास आहे ! मोहन विचार करू लागला. कुणाला माफ करणं कसं
काय अशक्य असू शकतं? मोहनने थोडा विचार केला आणि हातातलं कार्ड फाडून फेकून दिलं
आणि तो म्हणाला; “ बघ ! आता कुठलेच गुण
शिल्लक नाही आहेत.”
हे बघून त्या यंत्रमानवाची स्थिती खूपच बिघडली. त्यात बिघाड
होऊ लागला. त्याचे दिव्यासारखे डोळे चालू बंद होऊ लागले. खोक्यासारख्या त्याच्या
डोक्यातून धूर निघू लागला. त्याच्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले आणि लवकरच तो यंत्रमानव
धाड करून खाली कोसळला. अचानक सगळं शांत झालं. हा सगळा कोलाहल ऐकून एक मोठा
यंत्रमानव तिथे आला. त्याने काळ्या कोटासोबतच उंच काळी टोपी डोक्यावर घातलेली
होती. तो त्या पहिल्या
काळा कोट घातलेल्या यंत्रमानवापेक्षा मोठा अधिकारी वाटत होता.
दरवाजे उघडले गेले. मोहन बाहेर पडून चैतन्यला भेटला. आता
त्याच्या लक्षात आलं की इथल्या खऱ्या न्यायाची प्रक्रिया पाळणारे एकमेकांना मारून
मारून दमलेले आहेत. दमून खाली पडलेले आहेत पण न्याय काही होत नाहीये. एकमेकांना
सारखा मार देण्याने किंवा एकमेकांचं सारखं नुकसान केल्याने न्याय होणार नाही हे
त्यांना कळलेलं नाहीये म्हणून हे सगळं असं चाललंय.
लवकरच मोहन आपल्या ग्रहावर निघून गेला पण या खऱ्याखुऱ्या
न्यायसाठी आजही त्याचं नाव खोषा ग्रहावर घेतलं जातं.
गटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट
मित्रांनो, आता
तुम्ही आता म्हणाल, “गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या
गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय?” तर
मित्र-मैत्रिणींसोबत ज्यावेळी आपण गप्पा मारतो त्यावेळी आपल्याकडे विषय तर भरपूर
असतात म्हणजे “अक्षय कुमारचा जॉली एल.एल.बी. एकदम भारी होता
बरका,” इथपासून ते “अरे परवा विराट
कोहलीने कसली मस्त फिफ्टी मारली आणि तरी पण आपण हरलो रे!” इथपर्यंत खूप विषयांवर आपण कितीही वेळ गप्पा
मारू शकतो. पण त्या गप्पांचा ठराविक असा
काही उद्देश मात्र कधीच नसतो. बऱ्याच वेळा
त्यामुळे आपला नुसताच वेळ मात्र वाया जाण्याची
शक्यता असते. म्हणजे या गप्पा मारायच्याच नाहीत का? तर
नक्की मारायच्या पण याहीपेक्षा वेगळ्या गप्पा आपल्याला गटात मारता येऊ शकतात आणि
त्याचा फायदाहीहोतो.
या संपूर्ण चर्चेमुळे दोन गोष्टी घडल्या:
· बऱ्याच जणांना पक्ष्यांना पाणी मिळालं नाही तर ते मरतात
ही नवीन माहिती मिळाली.
· प्रत्येकाने खूप विचार केला. खूप गप्पा मारल्या पण
त्या गप्पांचं चर्चेत रुपांतर होऊन त्याचा फायदाच झाला.
यानंतर मात्र या गटाने ठरवलं की आपल्या गटाची कृती ठरवताना
सगळ्यात आधी सर्वांचं मत विचारात घ्यायचं, सगळ्यांनी त्यावर चर्चा करायची आणि मगच काय ते ठरवायचं. याचा आणखी एक
फायदा असा की नियम असो अथवा कृती; ती
सगळ्यांनी मिळून ठरवलेली असल्याने
प्रत्येक जण त्याचं पालन करतो. आता या चर्चेसाठी काही नियम जर आपण सगळ्यांनी मिळून
ठरवले आणि पाळले सुद्धा तर आपल्यात भांडणही होणार नाही आणि आपल्याला बऱ्याच नवीन
गोष्टी शिकायलादेखील मिळतील. तुम्हाला नियम ठरवायला मदत म्हणून काही सोप्पे नियम
उदाहरण म्हणून देत आहोत.
·
कुठल्या विषयावर यावेळी आपण चर्चा करणार आहोत हे गटातल्या
सगळ्या सदस्यांना २ दिवस आधी सांगून
ठेवा. म्हणजे प्रत्येकाला त्यावर विचार करायलाथोडा वेळ मिळेल. (याची जबाबदारी गट
प्रमुखाने घ्यावी)
·
चर्चेदरम्यान कुणीच कुणावर ओरडणार नाही आणि चिडणार सुद्धा
नाही.
·
आपल्या गटातले सगळे जण बोलतायेत ना याची काळजी घ्यायची.
एखादा जण जर बोलायला घाबरत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याला धीर द्यायचा आणि
बोलायला प्रोत्साहन सुद्धा.
·
तसंच आपल्या पैकी जर एखादा मुलगा किंवा मुलगी जास्त बोलत
असेल आणि इतरांना त्यामुळे संधी मिळत नसेल तर त्याला/तिला थोडा वेळ शांत बसायला
लावून इतरांना बोलायची संधी मिळेल याची काळजी घ्यावी.
·
आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं मत आपल्याला पटत नसेल तरी ते
पूर्ण ऐकून घ्यायचं आणि मगच आपलं मत मांडायचं. आणि जरी प्रत्येकाला आपलं मत पटलं नाही
तरी तिच्याशी/ त्याच्याशी कट्टी करायची नाही.
या चर्चेत अजून मजा येण्यासाठी जर तुमच्याकडे या विषयाशी
संबंधित एखादा व्हिडियो असेल तर तो, गोष्ट, कविता असेल तर ती तुम्ही वाचू शकता. कुणाला
त्या संबंधात काही आठवणी असतील किंवा विषयाशी संबंधित काही कुठे वाचलं ऐकलं असेल
तर ते देखील तुम्ही या चर्चेत सांगू शकता. याची जबाबदारी आपण आपल्या निमंत्रक ताई,
दादा किंवा शिक्षकांकडे देऊया.
आम्ही तुम्हाला अगदी सोप्पे नियम सांगतिले, तुम्ही सगळे मिळून याहीपेक्षा भारी आणि बरेच
नियम ठरवू शकता. चला तर मग आपल्या गटातील सगळ्यात पहिल्या गप्पा-गोष्टी-चर्चा
सत्राला आपल्याच ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ कट्ट्याचे नियम ठरवण्यापासूनच सुरुवात करूया
!
Subscribe to:
Posts (Atom)