Wednesday 30 September 2015

मुलांच्या लेखणीतून

जागृती गट
१५.०९.२०१५ या रोजी आमची बैठक झाली. आम्हाला महालक्ष्मीच्या सुट्या होत्या म्हणून आमच्या बैठकीत गावाकडे प्रत्येकजण काय करणार हे विचारल्यानंतर सर्व मुलांनी आपापले उपक्रम सांगितले. मी पण एक उपक्रम सांगितला, तो म्हणजे गावाकडे वृक्षारोपण कार्यक्रम घ्यायचा. तर आम्हाला महालक्ष्मीच्या सुट्या लागल्या. मी गावाकडे गेलो. मी व माझे मित्र गप्पा मारत होतोत. मी माझ्या मित्रांना प्रश्न विचारला की, भारत देशात पाऊस का पडत नाही, सर्वत्र दुष्काळ आहे याचे कारण सांगा. तर माझ्या मित्रांनी बरीच कारणे सांगितली. त्यात माझ्या एका मित्राने सांगितले की आपल्या भारत देशात झाडांची संख्या कमी आहे. मग मी म्हटलं की आपल्याला काही करायला येईल का? तर सर्व मुले म्हणाले की हो येईल ना. मग मी म्हणालो काय करता येईल तर सर्व मुले म्हणाली आपल्याला झाडे लावता येतील. मग मी दुसऱ्या दिवशी नर्सरी मधून काही लिंबाची झाडे आणली व प्रत्येक मुलाला एक एक झाड दिलं. तर प्रथम सर्व मुलांनी जागा निश्चित केली व आपापले झाड चांगल्या प्रकारे लावले नंतर मुलांनी त्याला खत पाणी टाकले. मी प्रत्येक मुलाला सांगितले की मी दिवाळीला आल्यानंतर सर्वांचे झाड पाहील तर तेव्हा मला झाडाला कुंपण व टवटवीत झाडे दिसली पाहिजेत. सर्व मुलांनी हो असे उत्तर दिले. असे आम्ही ३०-३५ झाडे लावली व सर्वाना संदेश दिला की ‘झाडे लावा झाडे जगवा’.

या उपक्रमातून मुलांना आनंद मिळाला व झाडेपण लावली गेली असे सर्व मुले म्हणाले हे ऐकून मला पण आनंद झाला. अशा प्रकारे मी वृक्षारोपण घेतले.




आपला,
प्रवीण बरगे
जागृती गट, बीड

गट निमंत्रक –रज्जाक पठाण (9422712446

ज्योतिबा गट
तर आमच्या कुमार निर्माण संघात संघनायक कोण होणार यासाठी मतदान घ्यायचं होत. संघनायकाच्या निवडणुकीला विनीत, जय, कमलेश, प्रतिक आणि देवयानी म्हणजे मी. मग त्यात मतदान अध्यक्ष प्रशांत होता मग गुप्त मतदान झाल, सगळ्यांना मतं मिळाली. प्रतीक्षाला पडले ५ मतं, कमलेशला पडले ४ मतं, विनीतला पडले ६ मतं, जयला पडले ३ मतं आणि मला पडले ७ मतं. मग मतदान अध्यक्षाने असे घोषित केले की देवयानीला जास्त मतं पडली आहेत म्हणून ती संघनायिका होईल. अशा प्रकारे मी संघनायिका बनली.
देवयानी अमृतकर
ज्योतिबा गट, चाळीसगाव
गट निमंत्रक: सोनाली नानकर (८७९३१६३३५२)

No comments:

Post a Comment